हम सब एक हैं.....
मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील उर्वरित महापालिकांसाठी फॉर्म्युला ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानसुार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी युती करुन निवडणूक लढवेल. मात्र इतर महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत हे तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील.
या निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती महायुतीने आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील। तिन्ही पक्ष वेगवेगळे लढल्यास मविआला व इतर पक्षांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो. ही बाब टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संघटीतपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मुंबईत महायुती एकत्र लढेल, असे संकेत दिले. देशातील सर्वात मोठी उलाढाल म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. या दोघांचे आव्हान महायुती कशाप्रकारे परतवून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे हे आम्ही लवकरच ठरवू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हम सब एक हैं...
दरम्यान मुंबई वगळता राज्यातील उर्वरित स्थानिक परिस्थितीचा विचार करून स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीतील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर मात्र महायुतीतील कुठल्याही पक्षाला मतदान करा ते मत महायुतीलाच जाणार असल्याने 'हम सब एक हैं' ची प्रचिती येणार आहे.
.jpeg)

Social Plugin